Ads Area

Maharashtra Weather News: राज्यात पावसाची शक्यता धूसर; तापमानात घट, काही दिवसात थंडी वाढणार, हवामान खात्याचा अंदाज

<p style="text-align: justify;">मुंबई : गेल्या आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज (Maharashtra Weather News) व्यक्त करण्यात आला होता. मात्र आठवड्याच्या सुरुवातीलाच हवामान स्वच्छ झाल्याने पावसाळी परिस्थिती पूर्णतः संपुष्टात आली आहे. यासोबतच किमान आणि कमाल तापमानात झपाट्याने (Maharashtra Weather News) घट होत असून, राज्यभर गारठा जाणवू लागला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील (Maharashtra Weather News) अनेक ठिकाणी अधूनमधून पाऊस होत होता. पण आता आकाश स्वच्छ होत असून, विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात स्पष्ट घट जाणवते आहे. विदर्भातही सकाळच्या वेळेस धुक्याचे प्रमाण वाढले असून, किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात आहे.(Maharashtra Weather News)&nbsp;</p> <h2><strong>Maharashtra Weather News: तापमानातील बदल</strong></h2> <p style="text-align: justify;">मागील दोन दिवस तापमान स्थिर होते, पण आता पुन्हा घसरण दिसत आहे. मुंबईतही गारवा वाढला असून गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, कुलाबा केंद्रात २३.५ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात २१.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले आहे. हवामान विभागाचा अंदाज आहे की, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात हिवाळ्याची तीव्रता वाढेल आणि सकाळ-संध्याकाळच्या वेळी थंडीचा प्रभाव अधिक जाणवेल.</p> <p style="text-align: justify;">राज्यावर गेल्या काही दिवसांपासून पावसाचे सावट होते. मात्र आता वातावरणातील आर्द्रता कमी झाल्याने आणि पावसासाठी अनुकूल परिस्थिती निवळल्याने राज्यात तापमानात झपाट्याने घट होत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत गारठा आणखी वाढेल आणि थंडी टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्य व्यापेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यानंतर राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान अचानक बदलले. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात आहे, तर विदर्भात सकाळच्या धुक्याचे प्रमाण वाढले आहे. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पुढील काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागांमध्ये थंडीचा प्रभाव अधिक जाणवेल.</p> <h2 style="text-align: justify;"><strong>Maharashtra Weather News: मुंबईसह इतर ठिकाणी तापमानात घट</strong></h2> <p style="text-align: justify;"><a title="मुंबई" href="https://ift.tt/1nlYyjC" data-type="interlinkingkeywords">मुंबई</a>तही दिवस-रात्रीच्या तापमानात घट झाली असली तरी गुलाबी थंडीची चाहूल अद्याप प्रतीक्षेत आहे. शनिवारी कुलाबा केंद्रात २३.५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २१.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर नाशिकमध्ये १३.४, सांगलीत १८, जळगावमध्ये १०, <a title="बीड" href="https://ift.tt/WfRL4Co" data-type="interlinkingkeywords">बीड</a>मध्ये १३.५, परभणीमध्ये १४.४, आणि डहाणू येथे १९.७ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले आहे. हवामान विभागाने इशारा दिला आहे की, आगामी आठवड्यात थंडीचा जोर वाढेल, विशेषतः उत्तर <a title="महाराष्ट्र" href="https://ift.tt/pdgTuN4" data-type="interlinkingkeywords">महाराष्ट्र</a>, विदर्भ आणि मराठवाड्यात सकाळच्या वेळेस गारठा आणि धुक्याचे प्रमाण अधिक दिसेल.</p>

from Maharashtra Function Special Report तीन सोहळे, साधेपणा; अनोखं लग्न, वरातीचा थाट आणि केळवण https://ift.tt/i7lCJT9

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area