राज्यात पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला असून, ३० सप्टेंबरपर्यंत मान्सून सक्रिय राहणार आहे. पावसामुळे राज्यातील पासष्ठ लाख एकर शेती पाण्यात आली आहे. मराठवाड्यात १ जून ते २२ सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या १२४ टक्के पाऊस झाला. मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा कोप दिसून आला, ज्यात मराठवाड्यात चार जणांचा मृत्यू झाला. जालन्यात एका गर्भवती महिलेला खांद्यावर नेण्याची नामुष्की ओढवली. शेतकरी मोठ्या संकटात आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आज धाराशिवमधील नुकसानाची पाहणी करून आढावा घेणार आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर एनडीआरएफच्या साथीने पाण्यात उतरले. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार असून, पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जाईल. नुकसानग्रस्तांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष आहे. धाराशिव, बीड आणि उत्तर सोलापुरातील शाळांना आज सुट्टी देण्यात आली. ८१ नवीन तहसील आणि २० नवे जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे, ज्यावर जनगणनेनंतर विचार केला जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त करण्यात आले असून, जिल्हाधिकारी प्रशासक असतील. राष्ट्रपती मुरमूंच्या हस्ते आज ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण होणार आहे. शाहरुख खान पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारणार असून, मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
from Drug Bust | Ambernath मध्ये MD, Heroin चा साठा जप्त, दाम्पत्याला बेड्या https://ift.tt/QqkuV9c
ABP Majha Headlines : 06:30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 23 Sept 2025 : ABP Majha
September 22, 2025
0