Ads Area

22nd July In History: राष्ट्रीय ध्वज म्हणून तिरंग्याचा स्वीकार, राज कपूर यांचा 'आवाज' गायक मुकेश यांचा जन्म; आज इतिहासात

<p><strong>22nd July In History:</strong> भारताच्या अंतराळ इतिहासासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. 14 जुलै 2023 रोजी उड्डाण घेतलेले भारताचे चांद्रयान-3 सतत त्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. अंतराळाच्या खोलीवर आणि चंद्र-ताऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे लोक प्रत्येक क्षणी त्याच्या प्रवासावर लक्ष ठेवून असतात. संपूर्ण देश त्याच्या यशासाठी प्रार्थना करत आहे. अशा परिस्थितीत हे जाणून घेणे मनोरंजक ठरेल की चार वर्षांपूर्वी, जुलैमध्येच चंद्राच्या अस्पर्शित पैलूंचा शोध घेण्यासाठी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) येथून चांद्रयान-2 प्रक्षेपित करण्यात आले होते. 'बाहुबली' GSLV-मार्क नावाचे सर्वात शक्तिशाली आणि प्रचंड रॉकेट 22 जुलै 2019 रोजी लाँच करण्यात आलं. देशाच्या अवकाश इतिहासातील एक मोठी उपलब्धी म्हणून याकडे पाहिले जात होते.</p> <p>देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 22 जुलै या तारखेला नोंदवलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांचा क्रमवार तपशील पुढीलप्रमाणे आहे,</p> <p><strong>1731: स्पेनने व्हिएन्ना करारावर स्वाक्षरी केली.</strong></p> <p><strong>1918: भारताचे पहिले कुशल वैमानिक इंद्रलाल राय पहिल्या महायुद्धात लंडनमध्ये जर्मनीशी लढताना शहीद झाले.</strong></p> <p><strong>1925 : इंग्रजी-मराठीतले पत्रकार आणि लेखक गोविंद तळवलकर यांचा जन्म</strong></p> <p>गोविंद तळवलकर (Govind Talwalkar) यांचं संपूर्ण नाव गोविंद श्रीपाद तळवलकर. हे इंग्रजी-मराठीतले पत्रकार आणि लेखक होते. वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक होते. सामाजिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय घडामोडीचे भाष्यकार, संपादक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचे बरेचसे लेखन पुस्तकरूपातही प्रकाशित झाले आहे. लोकमान्य टिळकांची परंपरा जपणारे आणि सामान्यांनाही समजेल अशी लेखनशैली जोपासणारे तळवलकर हे खऱ्या अर्थाने 'अग्रलेखांचे बादशहा' होते. भाषेवरील प्रभुत्व, राजकीय आणि सामाजिक भान आणि प्रचंड व्यासंग या जोरावर त्यांनी अग्रलेखांना एका वेगळ्या उंचीवर नेले होते.</p> <p><strong>1923 : पार्श्वगायक मुकेश यांचा जन्म&nbsp;</strong></p> <p>महान भारतीय पार्श्वगायक मुकेश चंद माथूर उर्फ मुकेश (Mukesh) यांचा जन्म 22 जुलै 1923 रोजी दिल्ली येथे झाला. अभिनेता राज कपूर (Raj Kapoor) यांचा आवाज म्हणून मुकेश यांना ओळखलं जायचं. मुकेश यांनी बॉलिवूडमधील अनेक गाणी गायली. 1959 मध्ये, त्यांना अनारी चित्रपटातील 'सब कुछ सिख्या हमने ना सीखी होशियारी' या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 1974 मध्ये, रजनीगंधा चित्रपटातील 'कै बार यूँ भी देखा है' गाण्यासाठी मुकेश यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.</p> <p>60 च्या दशकाची सुरुवात मुकेश यांनी कल्याणजी-आनंदजी, के दम-दम दिगा-दिगा, नौशादच्या मेरा प्यार भी तू है, आणि एसडी बर्मनची गाणी गायली आणि त्यानंतर राज कपूरच्या संगममध्ये शंकर-जयकिशनचे संगीत गायले, त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. &nbsp;</p> <p><strong>1947 : तिरंगा ध्वजाचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार</strong></p> <p>जेव्हा देशाचा तिरंगा (Tiranga) अभिमानाने फडकवला जातो तेव्हा एक अभिमानाची भावना येते, जी भारतीय असल्याची भावना देते. याच तिरंगा ध्वजासाठी (Flag of India) 22 जुलैचा दिवस ऐतिहासिक आहे. हा इतिहास राष्ट्रध्वजाशी संबंधित आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात या तारखेला विशेष महत्त्व आहे.</p> <p>22 जुलै 1947 रोजी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशनल हॉलमध्ये संविधान सभेच्या सदस्यांच्या बैठकीत तिरंगा देशाचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आला होता. या बैठकीत स्वतंत्र भारताचा ध्वज प्रस्तावित करण्यात आला. या प्रस्तावावर सखोल चर्चा होऊन भगवा, पांढरा आणि हिरवा ध्वज काही बदल करून स्वतंत्र भारताचा ध्वज बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.</p> <p>1959 - राज्याचे पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार (Ajit Pawar) यांचा जन्म.&nbsp;</p> <p>1969: सोव्हिएत युनियनने स्पुतनिक 50 आणि मोल्निया 112 संचार उपग्रह प्रक्षेपित केले.</p> <p>1970- <a title="महाराष्ट्र" href="https://ift.tt/mJHGKcD" data-type="interlinkingkeywords">महाराष्ट्र</a>ाचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा जन्म.</p> <p>1981: भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह Apple सक्रिय झाला.</p> <p>1988: अमेरिकेच्या 500 शास्त्रज्ञांनी पेंटागॉनमध्ये जैविक शस्त्रे बनवण्याच्या संशोधनावर बहिष्कार टाकण्याची शपथ घेतली.</p> <p>1999: समान कामासाठी समान मोबदल्याची कार्य योजना आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने लागू केली.</p> <p>2003: हुकूमशहा सद्दाम हुसेन यांचे दोन पुत्र इराकमध्ये हवाई हल्ल्यात ठार झाले.</p> <p>2012 प्रणव मुखर्जी भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून निवडून आले.</p> <p>2019: श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-2 (Chandrayaan-2) चे प्रक्षेपण.</p> <p>&nbsp;</p> <p>&nbsp;</p>

from maharashtra https://ift.tt/B0ok1y5

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area