Ads Area

27th May In History: सेंट पिटर्सबर्गची स्थापना, गांधी हत्येच्या खटल्याला सुरुवात आणि जवाहरलाल नेहरू यांचे निधन; आज इतिहासात

<p><strong>27th May In History:</strong> भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. इतिहासात आजच्या दिवशी महात्मा गांधी यांच्या हत्येच्या खटल्याची सुरुवात झाली. नथूराम गोडसे याने 30 जानेवारी 1948 रोजी त्यांची हत्या केली होती. तर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निधन 27 मे 1964 रोजी झालं होतं. यासह इतर महत्त्वाच्या घटना खालीलप्रमाणे,</p> <h2><strong>1703: सेंट पीटर्सबर्गची स्थापना</strong></h2> <p>रशियाच्या क्रांतीच्या (Russian Revolution) इतिहासात महत्त्वाचं स्थान असलेल्या सेंट पीटर्सबर्ग (Saint Petersburg) या शहराची स्थापना 27 मे 1703 रोजी रशियाच्या झार पीटर द ग्रेटने केली. सेंट पीटर्सबर्ग हे नेवा नदीच्या काठावरील एक प्रसिद्ध शहर आहे. मॉस्कोनंतर रशियामधील दुसरे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. 1713-1728 आणि 1732-1918 या काळात सेंट पीटर्सबर्ग ही रशियन साम्राज्याची राजधानी होती. 1918 मध्ये राजधानी मॉस्कोला हलवण्यात आली. सोव्हिएत युनियनच्या काळात त्याचे लेनिनग्राड असे नामकरण करण्यात आले. सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर त्याचे पुन्हा सेंट पीटर्सबर्ग असे नामकरण करण्यात आले.</p> <p>सेंट पीटर्सबर्गचे ऐतिहासिक केंद्र आणि स्मारकांचा समूह युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा समावेश आहे. सेंट पीटर्सबर्ग हे हर्मिटेजचे घर आहे. हे जगातील सर्वात मोठ्या कला संग्रहालयांपैकी एक आहे. सेंट पीटर्सबर्गमध्ये अनेक परदेशी वाणिज्य दूतावास, आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेशन, बँका आणि व्यवसायांची कार्यालये आहेत.</p> <p>&nbsp;या शहराला विशेष महत्त्व आहे आणि 1917 च्या महान रशियन क्रांतीचा साक्षीदार म्हणून या शहराला विशेष ओळख मिळाली.</p> <h2><strong>1906 : महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना</strong></h2> <p>महाराष्ट्र साहित्य परिषद (Maharashtra Sahitya Parishad, Pune) या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्थेची स्थापना 27 मे 1906 रोजी <a title="पुणे" href="https://ift.tt/y9E48ZF" data-type="interlinkingkeywords">पुणे</a> येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात करण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषद ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असून ती महामंडळाला दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन करते आणि सहभागी होते. त्याचबरोबर स्थानिक कवी, लेखकांना प्रोत्साहन मिळावे आणि साहित्य चळवळ ग्रामीण भागात खोलवर रुजावी म्हणून <a title="महाराष्ट्र" href="https://ift.tt/p3l0w8M" data-type="interlinkingkeywords">महाराष्ट्र</a> साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी विविध विभागीय आणि ग्रामीण संमेलने आयोजित केली जातात.</p> <h2><strong>1931 : मल्याळम कवी आणि गीतकार ओएनव्ही कुरूप यांचा जन्म</strong></h2> <p>मल्याळम कवी आणि गीतकार ओएनव्ही कुरुप यांचा जन्म &nbsp;27 मे 1931 रोजी झाला. त्यांचं संपूर्ण नाव ओट्टापक्कल नीलकंदन वेलू कुरूप (ONV Kurup) असं होतं. त्यांना 2007 साठी भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. 1998 मध्ये पद्मश्री आणि 2011 मध्ये पद्मविभूषण त्यांना मिळाला. 2007 मध्ये केरळ विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली. त्यांची विचारसरणी डाव्या चळवळीशी संबंधित होती. कुरुप हे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे (AISF) नेते होते. फेब्रुवारी 2016 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी तिरुवनंतपुरमच्या KIMS हॉस्पिटलमध्ये वयाच्या संबंधित आजारांमुळे त्यांचे निधन झाले.</p> <h2><strong>1935 : रमाबाई आंबेडकर यांचे निधन</strong></h2> <p>भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर (Ramabai Ambedkar) यांचे 27 मे 1935 रोजी निधन झालं. एप्रिल 1906 साली त्यांचा विवाह डॉ. आंबेडकरांसोबत झाला होता. आंबेडकरांचे अनुयायी त्यांना रमाई असं संबोधन करतात.&nbsp;</p> <h2><strong>1938 : भालचंद्र नेमाडे यांचा जन्मदिन</strong></h2> <p>भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) हे मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक, कवी असून लघुनियतकालिक चळवळीतील ते एक अग्रणी कार्यकर्ते आहेत. त्यांचा जन्म 27 मे 1938 रोजी जळगाव जिल्ह्यातील सांगवी या गावी झाला. 'कोसला' पासून 'हिदू'पर्यंत आपल्या प्रत्येक साहित्यकृतीने आणि लेखकाच्या नैतिकतेपासून देशीवादाच्या आग्रहापर्यंत प्रत्येक उक्तीने मराठी साहित्यविश्वात वादाचे मोहोळ उठविणारे भालचंद्र नेमाडे हे प्रखर भाषिक आत्मभान असलेले लेखक आहेत. भारतीय साहित्यात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ते आहेत.&nbsp;</p> <h2><strong>1948: गांधी हत्येचा खटला सुरू&nbsp;</strong></h2> <p>महात्मा गांधी यांच्या हत्येचा खटला (Assassination of Mahatma Gandhi) &nbsp;27 मे 1948 रोजी सुरू झाला. 30 जानेवारी 1948 रोजी नथूराम गोडसे (Nathuram Godse) याने गांधीजींची हत्या केली होती. वीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांचेही नाव गांधी हत्येशी जोडण्यात आलं आणि त्यांनाही सहआरोपी बनवण्यात आलं. एक वर्षभर चाललेल्या खटल्यानंतर नथूराम गोडसेला 8 नोव्हेंबर 1949 रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.</p> <p>मोहनदास करमचंद गांधी यांची 30 जानेवारी 1948 रोजी संध्याकाळी नवी दिल्लीतील बिर्ला भवन येथे हत्या करण्यात आली. ते रोज संध्याकाळी तिथे प्रार्थना करत असत. 30 जानेवारी 1948 रोजी संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी जात असताना नथुराम गोडसे त्याच्या पायाला स्पर्श करण्यासाठी आला आणि त्याने त्यांच्यावर तीन गोळ्या झाडून हत्या केली. &nbsp;</p> <p>या खटल्यात नथुराम गोडसेसह आठ जणांना हत्येच्या कटात आरोपी करण्यात आले होते. या आठ जणांपैकी शंकर किस्तैय्या, दिगंबर बर्गे, विनायक दामोदर सावरकर हे तीन आरोपी दिगंबर बर्गे मंजूर झाल्याने निर्दोष सुटले. हायकोर्टात अपील केल्यावर शंकर किस्तैय्या यांना माफी देण्यात आली. सावरकरांविरुद्ध कोणताही पुरावा न मिळाल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. शेवटी उर्वरित पाच आरोपींपैकी तीन आरोपींना म्हणजे गोपाळ गोडसे, मदनलाल पाहवा आणि विष्णू रामकृष्ण करकरे यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि दोन आरोपींना, नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशी देण्यात आली.</p> <h2><strong>1964 : पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन</strong></h2> <p>भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांचे आजच्या दिवशी म्हणजे 27 मे 1964 रोजी निधन झालं. स्वातंत्र्यानंतर मृत्यू होईपर्यंत असे 17 वर्षे त्यांनी पंतप्रधानपद भूषवलं. पंडित नेहरू यांनी गांधीजींच्या विचारावर विश्वास ठेवून स्वातंत्रलढ्यात सहभाग घेतला. पंडित नेहरू काँग्रेसमधील एक महत्त्वाचे नेते होते. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर पंडित नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान झाले.&nbsp;</p> <p>पंडित नेहरूंनी समाजवादी समाजरचनेचा पुरस्कार केला आणि आधुनिक भारताची पायाभरणी केली. देशाला विकासाच्या आणि आधुनिकतेच्या मार्गावर आणण्याचं श्रेय त्यांना जातं. नेहरुंनी त्यांच्या कार्याची छाप आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटवली. अमेरिका किंवा रशियाच्या गटात सहभागी न होता त्यांनी विकसनशील देशांची वेगळी मोट बांधत अलिप्ततावादी भूमिका घेतली.&nbsp;</p> <p>पंडित नेहरुंच्या काळात 1962 साली भारत आणि चीनमध्ये युद्ध झालं. त्यामध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला. पंडित नेहरूंसाठी हे धक्कादायक होतं, त्याची सल त्यांना कायम होती. त्यानंतर 1964 साली त्यांचा मृत्यू झाला.&nbsp;</p> <h2><strong>1957 : इंडियन कॉपिराईट अॅक्ट समंत झाला</strong></h2> <p>भारतीय कॉपीराईट कायदा (Copyright Act, 1957) 27 मे 1957 रोजी संमत झाला. कॉपीराइट कायदा, 1957 भारतातील कॉपीराईट कायद्याच्या विषयावर नियंत्रण ठेवतो. भारतातील कॉपीराइट कायद्याचा इतिहास ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील वसाहती काळापासून आहे. कॉपीराइट कायदा 1957 हा भारतातील स्वातंत्र्यानंतरचा पहिला कॉपीराइट कायदा होता आणि 1957 पासून या कायद्यात सहा वेळा सुधारणा करण्यात आल्या आहेत. कॉपीराइट (सुधारणा) कायदा 2012 द्वारे 2012 मध्ये सर्वात अलीकडील सुधारणा करण्यात आली.</p> <h2><strong>1957 : नितीन गडकरी यांचा जन्म</strong></h2> <p>भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा जन्म 27 मे 1957 रोजी झाला. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. नितीन गडकरींनी राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद भूषवलं. त्यानंतर ते देशाच्या राजकारणात सक्रिय झाले. नागपूरमधून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते निवडून आले. 2009 साली ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. केंद्रात त्यांनी रस्ते आणि वाहतूक मंत्री म्हणून उल्लेखनीय कार्य केलं.&nbsp;</p> <p><strong>1980: दक्षिण कोरियाच्या पोलिसांनी जनआंदोलन चिरडले, 2000 मरण पावले.</strong></p> <p><strong>1991: ऑस्ट्रियाच्या बोइंग विमानात स्फोट, 223 ठार.</strong></p> <p><strong>1997: ब्रिटीश महिलांचे पथक उत्तर ध्रुवावर पोहोचले.&nbsp;</strong></p> <p><strong>2006: इंडोनेशियामध्ये भीषण भूकंप, 6,600 ठार.</strong></p> <p><strong>2010 : भारताने ओडिशातील चांदीपूर येथील बालासोरा जिल्ह्यात धनुष आणि पृथ्वी 2 क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली.&nbsp;</strong></p> <p>&nbsp;</p>

from maharashtra https://ift.tt/EQKL4nY

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area