Ads Area

Sant Dyaneshwar Maharaj Jayanti 2022 : संत ज्ञानेश्वर महाराज यांची आज जयंती; या निमित्ताने जाणून घ्या त्यांच्या कार्याचा आढावा

<p style="text-align: justify;"><strong>Sant Dyaneshwar Maharaj Jayanti 2022 :</strong> <a title="महाराष्ट्र" href="https://ift.tt/XJ4dunM" data-type="interlinkingkeywords">महाराष्ट्र</a>ाच्या सांस्कृतिक जीवनात परमार्थाच्या क्षेत्रात अजोड व्यक्तिमत्व असणारे अलौकिक चरित्र, सुमारे 725 वर्षे महाराष्टातील सर्व पिढ्यांमधील, तसेच सामाजवर्गाने जे व्यक्तिमत्त्व आपल्या मनोमंदिरात एक अढळ स्थान म्हणून जपले आहे ते एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. संत ज्ञानेश्वर<strong> (Sant Dyaneshwar)</strong> हे 13 व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी आणि तत्त्वज्ञ होते. फक्त 16 वर्षांच्या लहान आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी (भगवद्गीतेवरील भाष्य) आणि अमृतानुभव यांची रचना केली. देवगिरीच्या यादव घराण्याच्या आश्रयाने या मराठी भाषेतील सर्वात जुन्या हयात असलेल्या साहित्यकृती आहेत आणि या मराठी साहित्यातील मैलाचे दगड मानल्या जातात. संत ज्ञानेश्वरांच्या विचारांमध्ये अद्वैतवादी वेदांत तत्त्वज्ञान आणि भगवान विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीवर आणि योगावर भर देण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वरांनी 1296 मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. आज संत ज्ञानेश्वर महाराजांची जयंती. या निमित्ताने जाणून घेऊयात त्यांच्या कार्याचा आढावा.&nbsp;</p> <p style="text-align: justify;">भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी आणि हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली.</p> <p style="text-align: justify;"><strong>संत ज्ञानेश्वरांचे बालपण&nbsp;</strong></p> <p style="text-align: justify;">ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे अकराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके 1197 (इ.स. 1275) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव आणि मुक्ताबाई ही धाकटी भावंडे.&nbsp;</p> <p style="text-align: justify;">आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला आणि ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.</p> <p style="text-align: justify;"><strong>संत ज्ञानेश्वरांचे कार्य :&nbsp;</strong></p> <p style="text-align: justify;"><strong>1.</strong> ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील &lsquo;ज्ञान&rsquo;, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.</p> <p style="text-align: justify;"><strong>2.</strong> असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे 9000 ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. 1290 मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते.</p> <p style="text-align: justify;"><strong>3.</strong> त्यांचा दुसरा ग्रंथ &lsquo;अनुभवामृत&rsquo; किंवा &lsquo;अमृतानुभव&rsquo; होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे 800 ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.</p> <p style="text-align: justify;"><strong>4.</strong> 'चांगदेव पासष्टी&rsquo; या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी 1400 वर्षे जगले असे मानले जाते. पण त्&zwj;यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले 65 ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय. यात अद्वैतसिद्धान्ताचे अप्रतिम दर्शन आहे.&nbsp;</p> <p style="text-align: justify;"><strong>5.</strong> &lsquo;अमृतानुभव&rsquo; या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या &lsquo;तीर्थावली&rsquo; मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर ज्ञानेश्वरमाउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या &lsquo;समाधीच्या अभंगां&rsquo;मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दुःख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह - या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.</p> <p><strong>महत्वाच्या बातम्या :&nbsp;</strong></p> <ul> <li><strong><a href="https://ift.tt/cSiP4uz Days in August : ऑगस्ट महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?</a></strong></li> <li><strong><a href="https://ift.tt/ixhUQWH 2022 : श्रावण महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?</a></strong></li> <li><a href="https://ift.tt/ZNcJxSt 2022 : भारतात सर्वत्र गोपाळकालाची उत्सुकता; 'अशी' आहे परंपरा</strong></a></li> </ul> <p>&nbsp;</p>

from maharashtra https://ift.tt/DHclt9M

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area