Ads Area

Akola Water Crisis : अकोल्याच्या उगवा गावात दुष्काळाचा अत्यंत भेसूर चेहरा समोर; माझाच्या बातमीनंतर आमदार नितीन देशमुखांवर गावकऱ्यांची माफी मागण्याची वेळ

<p class="abp-article-title" style="text-align: justify;"><strong>Akola Water Crisis अकोला :</strong> 'एबीपी माझा'ने अकोला जिल्ह्यातील उगवा गावातल्या पाणीटंचाईची भीषण (Water Crisis) दाहकता दाखवली होती. 'माझा'च्या या बातमीनंतर उगवा गावासह (Ugwa Village) जिल्ह्यात मोठी खळबळ उडालीय. 'माझा' च्या बातमीची दखल थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलीय. त्यांनी या संदर्भात लगेच तातडीची पाऊले उचलत गावकऱ्यांना पाणी देण्याचे निर्देश संबंधितांना दिलेत. उगवा हे गाव अकोला जिल्ह्यातील बाळापुर मतदार संघात येतंय. दरम्यान, या गावातील पाणीटंचाई प्रकरणी बाळापुरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी उगवावाशियांची माफी मागितलीये. या गावाला पाणी न मिळण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आपलीच असल्याचं आमदार देशमुख म्हणालेय.</p> <p class="abp-article-title" style="text-align: justify;">मात्र उगवा गावासह बाळापूर मतदारसंघातील 69 गावातील पाणीटंचाईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप आमदार देशमुखांनी केलाय. पुढच्या सहा महिन्यांमध्ये उगवा गावाच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटविणार असल्याचं आमदार देशमुख यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना म्हणालेय.</p> <h2 style="text-align: justify;"><strong>69 गावातील पाणीटंचाईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार- नितीन देशमुख</strong></h2> <p style="text-align: justify;">दरम्यान, 2022 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार असतांना बाळापूर मतदारसंघातील 69 गावांसाठी 219 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पातील पाणी यासाठी आरक्षित करण्यात आलं होतंय.&zwnj; मात्र महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर आलेल्या <a title="एकनाथ शिंदे" href="https://ift.tt/ovGD2LP" data-type="interlinkingkeywords">एकनाथ शिंदे</a> सरकारने या योजनेला स्थगिती दिलीय. त्यावेळी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी वान धरणातील पाण्याच्या आरक्षण निर्णयाला स्थगिती दिलीय. त्यानंतर आमदार देशमुखांनी <a title="अकोला" href="https://ift.tt/9cEOLxT" data-type="interlinkingkeywords">अकोला</a> ते नागपूरमधील फडणवीस यांच्या बंगल्यापर्यंत या प्रश्नावरून पदयात्रा काढली होती. मात्र देशमुख यांचं आंदोलन नागपूरात मोडून काढण्यात आलं होतं. यानंतर उच्च न्यायालयाच्या <a title="नागपूर" href="https://ift.tt/JBs3aP1" data-type="interlinkingkeywords">नागपूर</a> खंडपीठाने आरक्षण स्थगितीच्या निर्णयाला रद्द केलं होतं. फडणवीस आणि त्यावेळच्या सरकारने हा निर्णय घेतला नसता तर आज उगवा गावासह मतदारसंघातील 69 गावांना पिण्याचे गोड पाणी मिळालं असतं असा टोला यावेळी आमदार देशमुखांनी लगावलाय.</p> <p style="text-align: justify;">दरम्यान 2019 मध्ये उगवा गावाला आपण 64 खेडी पाणीपुरवठा योजनेत लोकांना पाणी मिळावं म्हणून अवैधपणे समाविष्ट केल्याचा &nbsp;गौप्यस्फोट आमदार देशमुख यांनी यावेळी केलाय.</p> <p style="text-align: justify;"><strong>इतर महत्वाच्या बातम्या&nbsp;</strong></p> <p class="abp-article-title" style="text-align: justify;"><strong><a href="https://marathi.abplive.com/news/maharashtra/big-rise-in-temperature-in-vidarbha-chandrapur-records-highest-temperature-in-the-country-1355372">विदर्भात सूर्याचा प्रकोप! चंद्रपुरात देशात सर्वाधिक तापमानाची नोंद, राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद?&nbsp;</a></strong></p> <ul> <li class="abp-article-title" style="text-align: justify;"><strong><a href="https://ift.tt/yqdafI4 Drought News :&nbsp; कुलूप बंद पाणी, दुर्दैवी कहाणी! अकोल्याच्या उगवा गावात दुष्काळाचा अत्यंत भेसूर चेहरा समोर; महिनाभरानंतर येतंय नळाला पाणी</a></strong></li> </ul>

from ABP Majha Headlines : 07 PM : 20 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स https://ift.tt/rmgTjX1

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area