Ads Area

Maharashtra ST Workers: राज्य सरकारकडून अपुरा निधी, एसटी कर्मचाऱ्यांची बँक व पीएफ ट्रस्ट अडचणीत; कामगार नेत्यांचा दावा

<p style="text-align: justify;"><strong>Maharashtra ST Workers:&nbsp;</strong> एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या ऐतिहासिक संपानंतर एसटी महामंडळाची (MSRTC) आर्थिक घडी विस्कटली असल्याचे चित्र असल्याचा दावा करण्यात येत असताना दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांची बँक (ST Workers Bank) आणि पीएफ ट्रस्ट (PF Trust) अडचणीत आली असल्याचा दावा एसटी कामगार नेते श्रीरंग बरगे यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने सरकारच्यावतीने न्यायालयात मान्य केले होते. पण गेले पाच महिने ही रक्कम सरकारकडून अपुरी येत असून एसटी बँक तसेच भविष्य निर्वाह निधी व उपदान या दोन्ही ट्रस्टकडे त्यांचा हिस्सा भरण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या रक्कमेवरील व्याज बुडत असून या संस्था अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे त्यांना कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत असल्याने या संस्था अडचणीत आल्याचा दावा &nbsp;<a title="महाराष्ट्र" href="https://ift.tt/TLKWQgk" data-type="interlinkingkeywords">महाराष्ट्र</a> एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.</p> <p style="text-align: justify;">एसटी कर्मचारी सभासद असलेली स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑफ बँक असून तिचे 87 हजार कर्मचारी सभासद आहेत. या बँकेची सभासदांनी घेतलेल्या कर्ज वसुलीची 120 कोटी रुपये इतकी रक्कम एसटी महामंडळाने बँकेकडे भरणा केलेली नाही. बँकने मात्र ही रक्कम कर्जदार डिफॉल्टर होऊ नयेत म्हणून कर्जदाराच्या कर्ज खात्यात जमा केली आहे. त्याचा फटका बँकेला बसत असून हीच &nbsp;रक्कम बँकेने व्याजाने गुंतवली असती तर त्यावर अंदाजे सव्वा कोटी रुपये पेक्षा जास्त व्याज मिळाले असते. पण, त्याचा फटका बँकेला बसला असल्याने बँक अडचणीत सापडली आहे. या प्रकाराबद्दल रिझर्व्ह बँकेने सुद्धा वारंवार आक्षेप नोंदवला आहे. बँक तांत्रिक दृष्ट्या अडचणीत सापडली असल्याचा दावा बरगे यांनी केला आहे.&nbsp;</p> <p style="text-align: justify;">या शिवाय भविष्य निर्वाह निधी व उपदान या दोन्ही रक्कमांचा एसटी कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र ट्रस्ट आहे. यासाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेल्या रक्कमेचा हिस्सा या ट्रस्टकडे भरणा केला जातो. तो हिस्सा सुद्धा गेले पाच महिने भरण्यात आलेला नाही. ही रक्कम अंदाजे 650 कोटी रुपये इतकी आहे. ही रक्कम ट्रस्टकडे भरणा न झाल्याने गुंतवणुकीनंतर त्यावर मिळणारे अंदाजे 12 ते &nbsp;15 कोटी रुपये इतके व्याज ट्रस्टला मिळालेले नाही. त्यामुळे या दोन्ही ट्रस्ट सुद्धा अडचणीत सापडल्या असून या संस्था सुद्धा गोत्यात आल्या आहेत. एसटी बँक व दोन्ही ट्रस्ट ह्या संस्था कर्मचाऱ्यांच्या असून त्या अडचणीत सापडल्याने कर्मचाऱ्यांचे सुद्धा नुकसान होत असल्याकडे कामगार नेते बरगे यांनी लक्ष वेधले.&nbsp;</p> <h3 style="text-align: justify;"><strong>नव्या सरकारने वाऱ्यावर सोडले</strong></h3> <p style="text-align: justify;">या व्यतिरिक्त एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्था, ग्राहक भांडार या संस्थांसुद्धा अनेक जिल्ह्यात असून त्यांचेही कोट्यवधी रुपयांचे देणे बाकी आहे. त्यामुळे या संस्था सुद्धा अडचणीत सापडल्या असल्याचा दावा करण्यात येत आहे. महाआघाडीच्या काळात वेतनाची पूर्ण रक्कम सरकारने दिली होती.पण नवे सरकार आल्यापासून एकदाही पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही. नवे सरकार न्यायालयात दिलेला शब्द पाळीत नसून कर्मचाऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप सुद्धा बरगे यांनी केला आहे.</p> <p style="text-align: justify;">&nbsp;</p>

from maharashtra https://ift.tt/LxpMZJu

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area